Tuesday, December 18, 2018

🏡वृध्दाश्रम 🏡
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com

          असाच एकदा फिरता फिरता वृध्दाश्रमाकडे पाय वळले. वृध्दाश्रम म्हणजे अनाथ आई-बाबांसाठी असलेले आश्रम. इथे अनाथ शब्द मुद्दाम वापरला आहे. आई-बापाला वार्यावार सोडुन दिलेल असतं म्हणजेच घरातुन बाहेर काढलेले असे अनाथ आई-वडील. ते मुळात अनाथ नसतात पण तुमच्या आमच्या सारखे त्यांना अनाथ करतात.
           नऊ महिने पोटात वाढवुन आपल्या मुलाला जन्म देतात. हव्या तशा सोयीसुविधा पुरवतात. पण तीचं मुलं मोठी झाल्यावर सगळं विसरुन जातात. स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्याला सांभाळते. ती आई आणि स्वतःची दुःख लपवुन काबाडकष्ट करतो तो बाप. यांचा जरा सुध्दा विचार तेव्हा केला जात नाही.
           परवाच कानावर आलं की एका विवाहीत मुलाने आपल्या आई-वडीलांना वृध्दाश्रमात नेऊन ठेवले. बिचारे आई-वडील रडत बसले होते. त्या मुलाला जाब विचारला असता त्याने सांगितले, माझ्या बायकोला वेगळं रहायचयं. तिला त्यांचा त्रास होतो. पटत नाही त्यांच्याशी. हे सगळं ऐकुन धक्का बसला होता. त्यावेळी त्याचे आई-वडील त्याच्याजवळ दयेची भीक मागत होते पण त्याला ती भीक दिसत नव्हती. मी तर म्हणतो, भीक मागायची वेळ आलीच कशी? अरे ज्या आई-वडीलांनी मागचा पुढचा विचार न करता तुला ईथपर्यंत वाढवलं त्याची जरा तरी लाज बाळगायला पाहीजे होती आणि बायकोचा ऐकणारा हा कोण? ती आज आलेय पण हे आई-वडील तुझ्या जन्मापासुन तुझ्या सोबत आहेत.
           हे सगळं बघुन चेहरा रडवेनासा झाला होता. आपली ही अवस्था होऊ शकते तर त्यांची काय अवस्था झाली असेल.त्या आई-वडीलांच्या समोर बसलो होतो. पण धीर देण्याशिवाय दुसरं काही करु शकत नव्हतो. नुकतचं त्या बापाने माझ्याजवळ मोबाईल आहे का विचारलं. फोन लावायचा होता त्यांना आपल्या मुलाला. मी आश्चर्यचकीत झालो कारण मोबाईल त्यांच्याजवळ सुध्दा होता. मी त्यांना मोबाईल तुमच्याजवळ सुध्दा असुन का मागितला असे विचारले. पण यावर त्यांचे उत्तर ऐकुन धक्काच बसला होता. " बाळा, मोबाईल आहे पण का कुणास ठाऊक मुलाचा फोन येत नाही. बहुतेक मोबाईल बिघडला असेल आमचा." पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोबाईल व्यवस्थित होता पण बिघडला होता त्यांचा मुलगा. थोडक्यात काय तर मुलगा त्यांना अजिबात फोन करत नव्हता. पण ते आई-वडील स्वतःच्या मनाची समजुत काढुन जीवन जगत होते.
           आज अशी वेळ का त्यांच्यावर आली? थोडा विचार करण्यासारखा आहे. ह्यात चुक कोणाची होती? स्वतःच विचार न करता तो त्यांच्यासाठी झटला तो बाप ही चुक होती की हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती आई ही चुक होती? तसं म्हणायला गेलं तर कित्येक आई-वडील वृध्दाश्रमात वाट बघत आहेत. पण त्यांच्या मुलांना भेटायला वेळ नसतो. आज ना उदया ही वेळ आपल्यावर सुध्दा येणार आहे हे क्षणार्धात आपण विसरुन जातो. बायकोचं ऐकुन घराबाहेर काढत असालं तर तुमच्यासारखा मुर्ख कोणी नाही.
          वृध्दाश्रमामध्ये एक पाटी वाचली होती, " सुकलेल्या पानांवरुन हळु चाला कारण एके काळी हीच पाने आपल्याला सावली देत होते " खुप मोठा अर्थ होता त्या वाक्यांमध्ये. ह्या सगळ्यांचा विचार करता करता कधी वृध्दाश्रमातुन बाहेर पडलो कळलचं नाही. पण अनुभव थोडा वेगळा होता.

---------------- समाप्त -----------------

Saturday, December 15, 2018

☕ चहा आणि बिस्कीट 💝
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
📧 - smrbhojane@gmail.com

           सकाळचे आठ वाजले होते.सुट्टीचा वार होता आज. कोवळ्या ऊन्हामध्ये तो मस्त बालकनीमध्ये चहाचे भुरके मारत बसला होता. कुठुन तरी सुर्यकिरणांचा कवडसा डोकावुन पाहत होता. मध्येच चहामध्ये बिस्कीट बुडवुन आस्वाद घेत होता. बिस्कीट त्याला जसं आवडत होत तसचं तिला ही आवडत होत. साहजिकच तिची आठवण आली त्याला.
           तीच ती त्याच्या आयुष्यातली प्रेयसी. थोडक्यात काय तर त्याच्या चहामधली बिस्कीटवाली. नटखट आणि सुंदर. मस्त चाललं होत त्याचं. तो तिचा आणि ती त्याची. फिरायचं म्हटलं तरी दोघं एकत्र असणारच. एकमेंकासोबत जास्त वेळ spend करणारे. Made for each other म्हणायला काही हरकत नाही. पण म्हणतात ना सुख आली की दुःख ही पाठ धरुन असतातच तसचं काहीस घडणार होत.
           लग्न ठरलं होत तिच. शेवटची भेट म्हणुन त्याला भेटायला आली होती ती. आज ती अलगद त्याने हात तिचा हातात घेतला होता. थोड्या दिवसानी हेच हात मेहंदीने रंगणार होते. परिस्थिती आज दोघांच्या विरुद्ध होती. एकत्र बसले असले तरी मनाने हळुहळु लांब जाणार होते. "तुझ्याशिवाय राहु शकत नाही रे" ती त्याच्या जवळ रडुन बोलत होती. तो मात्र तिला धीर देऊन पुर्णपणे खचला होता. कर्तव्यदर्शी आई वडीलांचा मान ठेऊन लग्न कर अस तोच म्हणाला होता. ह्या जन्मी नाही निदान पुढच्या जन्मी भेट होईल आपली असे तो तिला बोलला होता. ती मात्र हुंदके देत होती. आता त्या दोघांची परिस्थिती वेगळी होती. मैत्रीचा हा हात असाच असुदे असं वचन देऊन दोघांनी ही निरोप घेतला.
           कर्तव्यदर्शी आई वडीलांचा मान ठेवुन दोघंही वेगळे झाले खरे पण मन मात्र वेगळं व्हायला तयार नव्हतं. थोडक्यात काय तर compramise करावं लागलं होत. कर्तव्य आणि तडजोड ह्या दोन्ही गोष्टी बघाव्या लागणार होत्या.
            तितक्यात दारावरच्या बेलचा आवाज आला. तो भानावर आला. बिस्कीट विरघळुन चहाच्या तळाशी गेलं होत. तशाच तिच्या आठवणी ही बिस्कीटसारख्या विरघळुन मनाच्या तळाशी खोलवर गेल्या होत्या. आज दोघही आपापल्या वाटेने पुढे गेले होते. पण आजही ती बिस्कीटवाली त्याच्या सोबत सकाळी गोड आठवणी घेऊन त्याला भेटायला येते. त्याची गरमागरम चहा आणि ती त्याची गोड बिस्कीटवाली.

✍🏻पहाटेच्या त्या रम्य सकाळी
कोमल सुर्य किरणांच्या वेळी
आठवुन जाई गोड ओळी
बिस्कीटवाली अन् धुंद वेळी❣

--------- समाप्त -----------

Friday, December 7, 2018

*💔घटस्फोट💔*
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

           घटस्फोट ऐकायला थोड विचित्र वाटत ना.. पण आजकाल घटस्फोट म्हणजे एक प्रकारचं fad झालं आहे. पत्त्याचं घर मोडाव तस आजकाल संसार मोडली जात आहेत. त्याचचं छोटसं उदाहरण...
          सकाळचे नऊ वाजले तरी अजुन आवरलं नव्हत. तो मात्र तसाचं विचार करत बसला होता आणि ती ची खुप चिडचिड होत होती. आज कोर्टात जायचं होत. का तर घटस्फोटासाठी... तिला हवा होता... वेगळं व्हायचं होत तिला. कुणीतरी गरम तेल कानात ओतावं तशी त्याची अवस्था झाली होती. तीचं कारण कायं तर *"माझं तुझ्याशी पटतं नाही म्हणुन*" दोघही आपापल्या मार्गाने कोर्टाच्या दिशेने चालु लागले.
          दोन वर्ष झाली होती लग्नाला. मस्त राजा-राणी सारखा संसार चालु होता. पण हल्लीच तिची चिडचिड जरा जास्त वाढली होती. तसं म्हणायला गेलं तर दोघही चांगल्या पगारावर काम करत होते. पण माणुस पैसाच्या पाठीमागे धावु लागला की एकमेंकासाठी वेळ द्यायला त्याच्याकडे वेळ नसतो. तसचं काहीस ह्यांच्यामध्ये झालं होतं. बॉसची कटकट, घरची कटकट ह्या सगळ्यांमुळे तिची दिवसेंदिवस चिडचिड वाढत होती. तो मात्र शांत झाला होता. बोलणार तरी काय तो. अस म्हणतात बायकोसमोर नवर्याच काही चालतं का काही. तो ही ह्या गोष्टीला अपवाद होता. तो मुकाटपणे सगळं ऐकुन घेत होता, ती मात्र शब्दांवर शब्द वाढवतं होती.
          आज मात्र तिच्या वागण्याला मर्यादा राहीली नव्हती. सुट्टीचा वार असल्यामुळे दोघेही घरीच होते. सगळं कामकाज अगदी उशीरा हळुवार चाललं होतं. तो fresh होऊन tv बघत बसला होता आणि हिची काम करुन हालत बेकार झाली होती. तो मदत करायला गेला तर तिला आवडत नसे. म्हणे मला माझ्या कामामध्ये लुडबुड केलेली आवडत नाही. म्हणुन तो आपला शांत tv बघत बसला होता. झाल! तिच्या डोक्याचा पारा पुन्हा एकदा चढला. तिची बडबड सुरु झाली. तो बिचारा आपला ऐकुन घेत होता. आज जरा जास्तच राग दिसत होता तिचा. आता मात्र त्याचा नाईलाज झाला. त्याचं डोकं फिरलं आणि त्याने ही राग व्यक्त केला. जे नको व्हायला ते झालं. त्याने रागात तिच्या कानाखाली मारली. हाताची चांगली पाच बोटे उठली होती. तिने रडत रडत रागात वेगळं व्हायचा निर्णय घेतला. तोही कंटाळला होता सगळ्याला. तो ही तयार झाला. दोघांचेही कोर्टाच्या दिशेने वळले.
           आज तारीख होती कोर्टाची. दोघंही समोरासमोर कोर्टाच्या पिंजर्यात बसले होते. दोघांच्याही नजरा खाली बघत होत्या. अपराधी असल्यासारख्या भावना दोघांच्याही मनात येत होत्या. आज सगळं क्षणार्धात संपणार होतं. अलगद तिच्या डोळ्यांतुन अश्रु बाहेर पडत होते. तो आजंही तसाचं गप्प बसला होता. स्वतःला मनातल्या मनात प्रश्न विचारत. त्याला आपण कुठेतरी कमी पडलो याची जाणीव होऊ लागली. तसचं तिच्या ही मनात प्रश्नांचा काहुर तयार झाला होता. आपण नकळत का होईना खुप चिडचिड केली होती याची तिला ही जाणीव होत होती. पण आता पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नव्हता. आज पेनही हस्ताक्षर करायला तयार नव्हतं पण करणं भाग होतं.
          आता ह्यात चुकी कुणाची? त्याची की तिची? मी तर म्हणतो चुकी आहे ती दोघांचीही. दोघांपैकी एकाने तरी कमीपणा घ्यायला हवा होता. का नाही घेतला गेला तो? का तर हा 👉🏻मी👈🏻 पणा मध्ये आला. जर तोच जर स्वतःच मी पणा (ego) कमी केला असता तर आज वेगळं होण्याची वेळ आली नसती. थोडक्यात काय तर रबर ताणला गेला तर एका बाजुने सैल सोडावा लागतो नाहीतर रबर तुटायला वेळ लागत नाही. तसच ह्याचं झाल होत. शेवटी काय तर *नात्यात अडकणं खुप सोप्प असत पण नात टिकवणं खुप कठीण असतं*
           खरचं आज विचार करण्यासाठी गोष्ट आहे. घटस्फोट घेण्याआधी समोरच्याचा विचार करायला हवा. जर त्याने तिचा आणि तिने त्याचा विचार केला तर नक्कीच घटस्फोट घेण्याची वेळ येणारा नाही. घटस्फोट घ्यायचा असेल तर लग्न न केलेल बरं. घटस्फोट एकमेंकाच न पटणे, हुंडा, भांडण,अपुर प्रेम, इतर काही या कारणांमुळे शक्यतो होतो. पण कुठेतरी हे थांबल पाहीजे. आणि कधीतरी हे नक्कीच थांबेल..बाकी विचार करणं तुमच्यावर आहे.

*------------ समाप्त ------------*

Tuesday, November 20, 2018

*💝 थोडं विचार करुन तर बघुया 💝*
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

          ती म्हटलं की साहजिकच तिच्या स्त्रित्वाकडे बघितलं जातंं. पण ती कधी परिपुर्ण आहे की अपुर्ण आहे याचा कधी विचार केला आहे का? चला, थोडं विचार करुन तर बघुया...
          ती म्हटलं की साहजिकच निर्माण होतात त्या अटी, मर्यादा, संशय, आशा, आकांशा आणि अपेक्षा. या पलीकडे पण तीचं अस्तित्व आहे हे आपण विसरुनच जातो. जसं की या भुतलावर पुरुष आहे तस तीच ही अस्तित्व आहेचं. याचं अस्तित्वाचा थोडं विचार करुन तर बघुया....
          वंशाला दिवा पाहिजे पण तिच्या रुपाने पणती नको. का तरं, ती आली की निर्माण होतात त्या अडचणी. पण ती जर जन्माला आली नसती तर ही सृष्टी पुर्ण झालीच नसती. मी तर म्हणतो, तेजस्वी पणती एकदा उजळु तर द्या. त्याच तेजस्वी पणतीच्या प्रकाशमय उजेडाप्रमाणे थोडं विचार करुन तर बघुया....
          जन्मदाती ही आईच. ती आई होण्याआधी एक मुलगीच असते ना. कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थी पणे ती तिची ममता देते. जगात कुणालाच द्येचा पाझर फुटणार नाही पण या आईच्या ममतेला नक्की पाझर फुटतो. मग त्याच आईच्या ममतेचा थोडं विचार करुन तर बघुया....
           भाऊबीज आणि रक्षाबंधन म्हटलं की भावाप्रमाणे तिचा ही महत्वाचा सहभाग हा असतोच. तीच ती लाडकी बहीण. भावाला चिडवणारी पण वेळेला पाठीशी खंबीर उभी राहणारी. याच वेड्या खोडकर बहिणीचा थोडा विचार करुन तर बघुया....
          कॉलेज म्हटलं की अर्थातच येते ती मैत्रीण. हक्काने मैत्रीचा हात पुढे करणारी. परिणामी, वेळेला आपल्याला मदत करणारी. वेळेला आपली बाजु मांडणारी. त्याच मैत्रीखातीरं थोडा विचार करुन तर बघुया.....
          गोंडस आणि समजुतदार अशी ती आणि आपल्या आयुष्यातील मुख्य भुमिका गाजवणारी ती म्हणजेच बायको. आपल्या संसाराची गाडी कुठेही थांबु न देता आयुष्यभर आपल्या सोबत साथ देते. थोडक्यात काय तर, मनापासुन आपल्यावर प्रेम करणारी. त्याचं खर्या खुर्या प्रेमाचा थोडा विचार करुन तर बघुया.....
           तिची रुपे अनेक आहेत. पण आपण कधी त्या गोष्टीचा विचार करत नाही. थोडा कमीपणा घेऊन आपण तिचा थोडा विचार करुन तर बघुया. जास्त नाही थोडं करायचं आहे पण खुप मोठ बनायचं आहे. संधी आहे त्याच सोनं करुन बघुया...

*--------------समाप्त-------------*

Monday, November 12, 2018

💑 *लग्नानंतर बरचं काही...*💑
✍🏻 *लेखक - समीर दि.भोजने*
📲 *8975672933*
📧 *smrbhojane@gmail.com*
          असं म्हणतात की, लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. नवीन संसाराची सुरवात... पण नवीन संसारासोबत निर्माण होतात त्या अटी आणि मर्यादा. कधी त्या अटींचा आणि मर्यांदाचा विचारासोबत तिचा विचार केला आहे का आपण? लग्नानंतर बरचं काही बदलत.....
          एक मुलगी ही बापाची अमानत असते. इतके वर्षे सांभाळुन तो त्याची सोन्यासारखी अमानत एका परक्या घरी सोपवतो. पण तीच अमानत जेव्हा एखादा विनाशाकडे नेतो तेव्हा त्या गोष्टीचा कुणी विचार करत नाही. मुलगीच लग्न होऊन जेव्हा सासरी जाते तेव्हा सगळी माणसं तिच्यासाठी नवीन असतात अगदी तिचा नवरा सुध्दा. समजुन घेणारं जवळच कोणीच नसतं. पण अशा परिस्थितीत ती स्वतःला त्यांच्यात adjust करते. पण घरातले मात्र अपेक्षांच्या डोंगराखाली तिला दाबुन टाकतात. मी असं म्हणत नाही की, सगळ्या घरात असचं चालतयं पण 100% पैकी 75% घरामध्ये सध्या हेच चालत आहे.
          कधी आपण तिच्या मनाचा विचार केलाय का? मी तर म्हणतो, तिला स्वतःच्या घराशी adjust व्हायला तिला 5 ते 6 वर्ष द्या. 5 ते 6 वर्ष नाही निदान 3 ते 4 वर्ष तरी द्या. ति एक मुलगी आहे यंत्र नाही लगेच सगळं शिकायला. आई, वडील, भाऊ, बहीण या सगळ्यांना सोडून ती एका नवीन दुनियेत आलेली असते. तरी सुध्दा ती सगळं विसरुन स्वतःला लवकरात लवकर adjust करायला बघते. शेवटी तिची जिद्द असते ती. तरी नशीब आता हुंडा पध्दत बंद झालेली आहे. नाहीतर त्यावरुन परत तिचा छळ. तसं म्हटलं तर अजुन काही ठिकाणी हुंडा पध्दत चालु आहे. हुंडा योग्य तसा भेटला नाही की तिचा सासरी छळ चालु होतो थोडक्यात म्हणायला गेलं तर सासुरवास.
           कधी आपण तिच्या मनाचा विचार केला का, तिला काय वाटत असेल. त्या ठिकाणी आपली बहीण असती तर काय केल असत? मग ती पण कुणाची तरी बहीण, मुलगी आहेच की. द्या ना तिला थोडी सुट. मग बघा कशी तुमच्या कुंटुबाशी लवकरात लवकर adjust होते. कधी तरी तिला बोला, आज तु नको मी करतो काम, तु आराम कर जरा... कधी तरी तिला बोला, आज फिरायला जाऊ.... कधी तरी तिला बोला, चल आज तुझ्या मित्र-मैत्रिणींना भेटु.... कधी तरी तिला बोला, आज बाहेर जेवायला जाऊ.... हे सगळं बोलुन तर बघा मग ती ही आनंदी होईल. संसार म्हटल की वाद-विवाद हे आलेच पण टोकाला जाऊन निर्णय घेणे हा त्याच्यावर उपाय नाही. भांडण ही शांत बसुन सोडवता येतात.
           संसारात संशय नावाचं भुत आला की संसाराची वाट लागायला वेळ लागत नाही. जसे तुमचे मित्र-मैत्रिण आहेत तसे तिचे असतीलच ना.. तिला ही वाटत असेल त्यांच्याशी बोलाव. एकदा मोकळीक देऊन तर बघा. तिला ही बरं वाटेल. लग्न झालं म्हणजे मित्र-मैत्रिण तुटत नाहीत. कधीतरी तिच्या डोळ्यात डोळे घालुन तिच्याशी बोला तिला ही बरं वाटेल. कधीतरी तिला प्रेमाने समजावुन सांगा मग तीही तुम्हाला समजावुन घेईल. हे सगळं नवरा म्हणुन फक्त तुम्हीच करु शकता. एका बापाने त्याची अनमोल संपत्ती सोपवलेली असते ती कशी ठेवायची तुमच्यावर.
            रबर ताणला गेला की कुणीतरी सैलपणा घ्यावा लागतो नाहीतर तो तुटला जातो. तसचं संसारात सुध्दा कधीतरी कमीपणा घ्यावा लागतो. आपण स्वतःहुन कमीपणा घेऊन बघा. पुढच्या वेळी ती नक्की कमीपणा घेईल. तिच्याकडे बायको म्हणुन बघण्यापेक्षा सर्वस्व म्हणुन बघा. नुसतं शरीराने जवळ जाण्यासाठी तिच्या जवळ जाऊ नका. तिचा अपमान तसा करु नका. सगळं काही माझ्यासाठी तुचं आहेस हे पटवुन द्या तिला. आयुष्यातील तिची जागा तिला कळु द्या.
           हे सगळं एकदा करुन तर बघा. लग्नानंतर बरचं काही करता येतं फक्त ते वेळेवर करता आलं पाहीजे. विषय थोडा वेगळा आहे पण विचार करण्यासारखा आहे. जे सुचलं ते लिहील.

*..........................समाप्त................*

Tuesday, October 30, 2018

❣ *प्रेम - एक वादळ*❣

❣ *प्रेम - एक वादळ*❣
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

*भाग*- *4*

          सुहास आणि काव्या दोघेही खुप खुश होते. दोघे एकमेंकासाठी वेळ देत होते. Made for each other म्हणायला काही हरकत नाही. दोघे जरी एकमेंकावर प्रेम करत असले तरी अभ्यासतही तेवढेच हुशार होते. तसं म्हणायला गेलं तर दोघांनीही ठरवलं होतं जेवढा वेळ आपण आपल्यासाठी देऊ तेवढाच वेळ आपण इतरांसाठी ही द्यायचा. कॉलेजला गेल्यावर तु तुझ्या मित्रांमध्ये आणि मी माझ्या मित्रांमध्ये असे दोघांनीही एकमेंकाना समजावलं होत.
          त्याच झालं अस, काव्याचा खास मित्र म्हणण्यापेक्षा अगदी भाऊच तिचा. अभिषेक नाव होत त्याचं. सगळे लाडाने अभि बोलायचे त्याला. खुप जवळचा होता तिचा. अगदी सख्खा भाऊ तसाच तोही. खुप frankly आणि समंजस होता. सुहास आणि त्याची जास्त ओळख नव्हती. तसं म्हणायला गेलं तर सुहास अभि वर जळत होता. कारण ही तसचं होत. अभि उठता बसता सारखा काव्याचा जवळ असायचा. सुहास ला ते पटत नसायचं. पण जेव्हा काव्याने सुहास आणि अभि ची ओळख करुन दिली तेव्हापासुन दोघंही एकमेंकाचे खास झाले होते. आता मात्र सुहासला काहीच problem नव्हता. कारण त्याला माहितं होतं जरी सुहास काव्याच्या जवळ नसला तरी तिची काळजी घेणारा तिचा भाऊ अभि आहेच. तेव्हापासुन सुहासने  कधीच आभि आणि काव्याबद्दल मतभेद केला नाही. पण अचानक अभि सुहासजवळ बोलायचा बंद झाला. कारण काय हे कुणालाच ठाऊक नव्हतं. अगदी सुहासला सुध्दा कळत नव्हत. सुहास अभिला सारखा विचारायचा, " *अभि काय झालं? बोलायचा बंद का झालास? माझं काही चुकलं का?*" पण अभि त्याकडे दुर्लक्ष करत होता. एवढं होऊन सुध्दा सुहास काव्याला कधीच बोलला नाही की, काव्या अभिसोबत राहु नको म्हणुन.  उलट सुहास बोलायचा तिला, " *काव्या माझ्याशी नाही बोल्लीस तरी चालेल पण एका चांगल्या मित्राला गमवू नको.*"
          काव्याला सगळं पटत होत. काव्या होतीच तशी समजुतदार. हळुहळु नंतर अभि सुहास जवळ बोलायला लागला. " *सुहास माफ करं. पण मलाच माहीत नाही मला कायं झालं. कसला माज आला होता माहित नाही.*" अभि खजिल होऊन बोलत होता. " *असुदे रे, तुला चुक कळली ना बास! जाऊदे सोड. मला राग नाही त्याचा*" सुहास अभिला जवळ करुन बोलला. आता मात्र दोघेही खुश होते. हे सगळ बघुन काव्याला खुप बरं वाटतं होतं. कारण ही तसच होतं. एक चांगला मित्र होता आणि एक चांगला bf होता. दिवस मस्त चालले होते. जसा सुहास काव्याच्या सोबत होता तशी काव्यासुद्धा सुहासच्या सोबत साथ देत होती.
           एके दिवशी सुहास काव्याला भेटायला गेला होता. दोघेही मस्त बोलत बसले होते. पण अचानक सुहासच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुहास काव्याच्या मांडीवर डोके ठेवुन रडायला लागला. काव्याला काय करु सुचतं नव्हतं. " *अरे वेड्या, रडतोस काय? काय झालं सांग ना रे?*" काव्याला काहीच समजतं नव्हतं. सुहास पहिल्यांदा कुणासमोर तरी एवाढा रडत होता. " *काव्या, मी तुला खुप त्रास देतो ना गं? पण खरचं मुद्दाम नाही गं करतं*" सुहास हुंदके देत रडत होता. " *अरे मी बोलले का त्रास देतोस ते? तु माझ्यासाठी करतोस रे. असं नको ना रे बोलु.*" काव्याच्या डोळ्यात पाणी आलं होत. काव्या सुहासला शांत करत होती. रोज हसवणारा, रोज रागवणारा, रोज बडबड करणारा सुहास आज रडवेला बघुन काव्याला वाईट वाटलं होतं. नंतर दोघेही शांत झाले आणि बस मधुन निघुन गेले.
           जसा सुहास काव्याच्या नाराजी दुर होण्याचा कारण बनत होता तसचं हळुहळु काव्या सुद्धा सुहासच्या नाराजी दुर होण्याची कारण बनत होती. सुहास जेवढं सुख-दुःख कुणाला सांगत नव्हता तेवढं तो काव्याजवळ share करत होता.पुर्ण कॉलेजमध्ये दोघेही famous झाले होते. जवळ जवळ दीड वर्ष त्याचं relation कॉलेजमध्ये कुणालाच  माहित नव्हत. तसे ते दोघे वागत होते. कॉलेजमध्ये जाताना दोघेही ठरवायचे, तु तुझ्या मित्रांमध्ये राहायचा आणि मी माझ्यां मित्रांमध्ये. तेवढचं study कडे ही लक्ष द्यायचं. पण नंतर हळुहळु कॉलेजमध्ये त्या दोघांच्या नात्याबद्दल समजलं. शेवटी सगळे आश्चर्यचकित झाले होते. कारण एकाच कॉलेजमध्ये असुन दीड वर्ष relation लपुन ठेवणे हे त्या दोघांनीच केलं होतं. काव्यामुळे सुहासचा बराचसा राग कमी झाला होता. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकला होता. तसं म्हणायला गेलं तर सुहासला कधी कसलीच भीती वाटत नसायची कारण त्याच्यासोबत साथ देणारी काव्या असायची......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*क्रमशः*

❣ *प्रेम - एक वादळ*❣

❣ *प्रेम - एक वादळ*❣
✍🏻 *लेखक* - *समीर दिलीप भोजने*.
📲  *८९७५६७२९३३*
📧 - *smrbhojane@gmail.com*

*भाग*- *३*

          अचानक मोबाईल वर मेसेज आल्याचा आवाज आला. काव्याचा मेसेज होता तो. सुहासने पटकन मोबाईल हातात घेतला आणि मेसेज openकेला. *"सुहास माफ करं मला, पण ते शक्य नाही. माझ्या आयुष्यात आधीच कोण तरी आहे.*" काव्या पटकन बोलुन गेली. सुहास थोडा नाराज झाला होता. पण त्याने नाराजी काव्याला दाखवली नव्हती. नंतर नेहमीप्रमाणे त्याचं बोलनं सुरु राहिलं.
          दुसर्या दिवसापासुन सुहास काव्याला भेटण्याचं टाळत होता. पण काय करणार! त्याला तसही राहावत नव्हत म्हणुन तो गुपचुप तिला लांबून बघत राहायचा. हळुहळु दिवस सरत होते. पण काव्या मात्र त्याला नेहमी प्रमाणे नकार देत होती. नंतर सुहासने मनाशी पक्क ठरवलं होतं, आता एक दिवस आपण असा आणायचा की, हीच काव्या आपल्या स्वतःहुन प्रेमात पडेल. आणि तो दिवस शेवटी आलाच.
          एके दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला दोघेही आले. नेहमीप्रमाणे lectures वैगेरे चालु होते. पण आज काव्या जरा उदास होती. सुहासच्या ते लक्षात आलं होत. त्याने खुप तिला विचारायचा प्रयत्न केला. पण काव्याने त्याला सांगितले नाही. शेवटी न राहुन सुहास बोलला, " *काव्या तुझा bf नसलो म्हणुन काय झालं, एक चांगला मित्र तर आहेच ना? काय problem आहे तो सांग. मी काहीतरी मदत करेन.*" शेवटी न राहुन काव्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि रडायला लागली. सुहासला बघवतं नव्हतं ते. काव्याला रडताना पहिल्यांदा बघितलं होत त्याने. तिला धीर देत होता. " *सुहास तुला कसं सांगु रे, माझं आणि त्याचं आता पटत नाही रे. खुप त्रास देतोय मला तो.*" काव्या रडवेल्या स्वरात बोलत होती. सुहासला हे सगळं ऐकुन शॉक बसला होता.
          सुहासने काव्याला धीर द्यायचा प्रयत्न केला. " *कंटाळा आलाय रे मला आता जगण्याचा. काय करु रे मी?*" काव्या पुर्णपणे हतबल झाली होती. सुहासला सगळं ऐकुन काय करु सुचतं नव्हतं. " *काव्या घाबरु नको, मी आहे ना सोबत. मी करतो काय तरी, पण अशी हताश होऊ नको.*" सुहास बोलतच होता. " *अशी जीवनाला कंटाळु नको. आपण काय तरी मार्ग काढु.*" सुहास इता तिला चांगला धीर देत होता. काव्याला आता थोडं बरं वाटत होत. सुहासने बोलल्याप्रमाणे 7-8 दिवसांत काव्याला तिच्या problem मधुन पुर्णपणे बाहेर काढलं होत. आता काव्या व्यवस्थित वाटत होती. आनंदी झाली होती.
           असचं एके दिवशी सुहास आणि काव्या कॉलेजच्या खिडकीमध्ये बोलत उभे होते. " *सुहास खरचं तेव्हा तु नसतास माझं काय झालं असतं*" काव्या त्याच्याकडे बघुन बोलत होती. " *मी तर तुला नकार दिला होता, तरी तु माझी साथ सोडली नाहीस. असं का सुहास.*" सुहास आता थोडा भावानिक झाला होता. " *काव्या तु नाही बोललीस त्याचा राग नव्हता मला. मी जर तुझ्यावर प्रेम करत होतो ना मग बसं झालं आणि साथ द्यायच बोललीस तर तु तेव्हा एकटी पडली होतीस पण माझ्याशी share केलसं तु मला खुप होत ते.*" सुहास बोलतच होता आणि काव्या त्याच्याकडे बघतच राहिली. " *तु माझ्यावर प्रेम करतेस की नाही हा विचार नाही केला मी, तुला आज आधाराची गरज आहे आणि ते माझ्यामुळे शक्य होत असेल तर मला आनंद आहे. कारण प्रेम करुन नुसतं होत नाही. तु एक मुलगी आहेस त्यापेक्षा तु कुणाची तरी एक मुलगी किंवा बहिण आहेस हे जास्त महत्वाचं होत तेव्हा माझ्यासाठी.*" सुहास समजूतदारपणे बोलत होता. आज सुहासच्या बोलण्यात वेगळीच चमक होती. काव्याच आज लक्ष फक्त सुहासकडे होतं.
           आज खर्या अर्थाने सुहास बोलत होता. अक्षम्य आणि अगण्य असे भाष्य. काव्या तेव्हापासुन सुहासच्या प्रेमातच पडली होती. अस म्हणतात की, प्रेम मुद्दाम मागुन मिळत नाही तर ते व्हायला फक्त एक क्षण बाकी असतो. तोच हा क्षण. त्या दिवशी काव्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.सुहास भलताच आनंदी झाला होता. त्याला आता हे विश्वच सुंदर दिसायला लागलं होतं. इकडे मात्र classroom मधली मुलं मुली बाहेर गेली तरी ते दोघे मात्र बोलतच होते. आनंदाचा क्षण होता ना शेवटी तो दोघांसाठी......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*क्रमशः*