Monday, January 10, 2022

🚫 ब्रेकअप नंतर काय? 🚫

   🚫 ब्रेकअप नंतर काय? 🚫

✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  8975672933/7058167957

🅱 - sambhojane1.blogspot.com      

    

           ब्रेकअप नंतर काय? आश्चर्य वाटलं नां? वाटायलाच हवं..... थोडा वेगळा विषय आणि विचार करण्यासारखा.

           ब्रेक-अप नंतर काय तर मन उदास करून बसणे, वाईट सवय लावून घेणे, सतत दुःखी राहणे आणि नको त्या गोष्टीचा विचार करणे. पण नक्की ब्रेकअप नंतर काय? आजवर कुणाला उलगडलं नाही. ब्रेकअप म्हणजे फक्त आणि फक्त तिने किंवा त्याने धोका दिला हे समजले जाते. पण ब्रेकअप नंतर ची दुनिया खूपच वेगळी आणि सुंदर असते हे आजकालची तरूणपिढी म्हणण्यापेक्षा युवापिढी यांना अजुन कळली नाही.

           मला नाही वाटत प्रत्येक वेळेस ब्रेकअप वाईट असतो. आज अशी युवा पिढी बघायला मिळते, ज्यांना ब्रेकअप झाल्यानंतर कळतं की बाबु,शोना या पलीकडेही जग आहे. आपला जन्म फक्त तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी झालेला नाही. या पलीकडेही अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. Actually ब्रेकअप हे पोरकटपणा आणि बालिशपणा काढून खऱ्या आयुष्यात प्रॅक्टिकल जगायला शिकवते आणि जी लोकं Positive आहेत तीच लोक आपलं काय चुकलं आणि आपण अजुन कसे चांगले बनु शकतो हे बनण्याचा प्रयत्न करतात.

           खरंतर ब्रेकअप खूप सारे Life Lessons देऊन जाते. पण माझ्या मते ब्रेकअप हे एक फक्त प्रेमामध्ये होते असे नाही अशी खुप नाती आहेत जी ब्रेकअप च्या नावाखाली मोजली जाऊ शकतात. मग ते नाते मैत्रीचे असो, भावा- बहिणीचे असो, नवरा बायकोचे असो वा एका अनोळखी व्यक्तीसाठी असो. फक्त ज्याला त्याला ज्या नजरेने बघतो त्या नजरेने आपण त्याला नाव देत असतो. आपण फक्त एकच ठरवलं आहे ब्रेकअप म्हणजे प्रेमात धोका.

           वाईट वाटणं सहाजिकच आहे आपल्याला.एखाद्या व्यक्तीशी झालेलीे एवढी Attacgment तोडणे एवढं सोपं नसतं. मग त्यामध्ये काही जण कबीर सिंग होतात तर काही जण देवदास होतात. तसे पाहायला गेल्यास ब्रेकअप ही एक Ultimately शक्ती आहे मग ती तुम्ही कसे Handle करता यावर सर्व अवलंबून आहे. मग तुम्ही व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःची Life विनाशाकडे न्यायची की स्वतःमध्ये Improvement करून स्वतःला Better बनवायचं हे तुमच्या विचारसरणीवर अवलंबून. मग आपण ठरवायचं Life Collapse करायची की Life मध्ये Shining आणायची. विषय थोडा वेगळा आहे पण विचार करण्यासारखा आहे.

----------------------- समाप्त -----------------------

Tuesday, January 4, 2022

🚫 नात्यांमधील गुंता 🚫

 ✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.

📲  8975672933/7058167957

🅱 - sambhojane1.blogspot.com  

            नातं म्हटलं की आठवतात अखंड, अविरत, चिरंजीव अखेर चालत आलेली एक आयुष्याची गाडी. मग त्या आयुष्याच्या गाडीत कधी कधी छोटी मोठी वादळे येतात तर कधी विकोपाला जाणारी युद्ध सुद्धा येतात. पण याच वादळातून आणि विकोपाला जाणार्या युध्दांमधून त्यांना सामोरे कसे जायचे याचे धडेही मिळतात आणि अनुभवही.

          नाती म्हणजे माणसांचा एक मोठा सन्मान असतो जसा सन्मान तसा दर्जा त्या त्या माणसाला मिळत जातो. पण कधी कधी हीच नाती गुंतागुंतीची होऊन माणसातल्या माणुसकीवर काळिमा फासतात आणि त्यांना उद्ध्वस्त करतात. मग त्या नात्यांमधील गुंता नवरा-बायकोचा, आईवडील-मुले, गुरू-शिष्य, मित्रमंडळी, भावंड, प्रियकर-प्रेयसी वा अन्य कुठले यांचाही असू शकतो. एकमेकांशी एखादे नाते जोडले गेले किंवा जुळले गेले की आपोआप निर्माण होतात त्या अपेक्षा आणि ह्याच अपेक्षांमुळे गुंतून गेलेल्या नात्याचे रूपांतर नात्यांच्या गुंत्यामध्ये होते.

          बऱ्याच वेळा प्रियकर-प्रेयसी त्यानंतर नवरा-बायकोमध्ये रूपांतर होते. कधी कधी ही नाती निभावणं  आणि टिकवणं कठीण होऊन बसते. गुंतून गेलेल्या नात्याचे रूपांतर नात्याच्या गुंत्यामध्ये होते. मुले मोठी झाली की त्यांना पंख फुटतात आणि आई-वडिल अन् त्यांच्यामध्ये मतभिन्नता वाढत जाते. आणि त्यातूनच नात्यामधील गुंता वाढून अबोलपणाच्या आणि विभक्त कुटूंबाच्या गाठी निर्माण होतात. मग दिसू लागतात वृद्धाश्रमाच्या वाटा आणि दरवाजे.

          एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून अमूर्त गुरू-शिष्याचे नाते निर्माण केले. त्यामध्ये तो गुंतत गेला. हे नाते निभावता निभवता त्याला उजव्या हाताचा अंगठा दक्षिणा म्हणून गमावला लागला. ह्या गुरू-शिष्याच्या निर्मळ नात्यातही गुंता होताच.

          मैत्री अशी आहे की नकळत एकमेकांशी मैत्री कधी होऊन जाते कळत नाही. आपोआप त्यात गुंतत जातो. निर्माण होता छोट्यामोठ्या तोडक्या-मोडक्या अपेक्षा आणि नात्यांमधील गुंता वाढत जातो. "ही दोस्ती सुटायची नाय" बोलणं खूप सोप्प आहे पण जेव्हा ह्याच दोस्तीचा गुंता वाढत जातो तेव्हा सोडवणं तेवढेच कठीण.

           काहीही असलं अन् कसही असलं तरी "धरलं तर चावतयं, सोडलं तर पळतयं" आणि "बोटं धरायला दिल की हात धरतयं" असं आहे. माणूस असा आहे ना कुठल्या ना कुठल्या नात्यात गुंतत असतो. नात्याशिवाय जगणेच माणसाला कठीण आहे. मानवतेचे दुसरे नावच नाते होईल. जोपर्यंत हा माणूस पृथ्वीवर जिवंत राहील तोपर्यंत "नाते" ही अविरत राहील. मग ते कुठलेही नाते असो वा नात्यांमधील गुंता असो.


------------------------ S. D. Bhojane --------------------------